उद्देश आणि ध्येय


१) संप्रदाय, धर्म, वर्ण, जाती, लिंग, प्रदेश, भाषा आदि भेदभाव विरहीत अशा विशुद्ध अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा मानवाच्या नैतिक उन्नती व चारित्र्यसंवर्धन तसेच आत्मोन्नती करीता प्रसार व प्रचार करणे.
२) समता, माणुसकी, एकता आणि विश्वबंधुता या तत्त्वांच्या प्रसार करून शांती निर्माण करणे व टिकविण्याचा प्रयत्न सर्व प्रकारे करणे.
३) समाजातील दिनदुबळ्या घटकांसाठी अन्न, वस्त्र औषधे यांची निःशुल्क व्यवस्था करणे.
४) आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम हाती घेणे, कार्यान्वित करणे व पार पाडणे.
५) आत्मशक्तिसंपन्न उत्साही, होतकरू, समाजहितैषी अशा तळमळीच्या सज्जन चारित्र्यवान आरोग्य व बल संपन्न आणि निस्वार्थी कार्यकर्त्यांची संघटना तयार करून त्याद्वारे समाजात सद्प्रवृत्ती वाढीस लागण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणे व त्यासाठी योग्य ती व्यवस्था करणे.
६) जगातील सर्व धर्म व संप्रदायांचे वाड़मय एकत्र करणे, ते साठवणे व त्याचे शिक्षण देणे.
७) आरोग्य प्राप्ती, बलसंवर्धन आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता योग साधना करू इच्छिणाऱ्या व्यक्तिंना त्यांसंबंधी साधने, मार्गदर्शन आणि वातावरण उपलब्ध करून देणे.
८) ठिकठिकाणी तपोवने (गुरुकुलासहित) उत्पन्न करून शास्त्रीय साधने व वनीकरणाद्वारे पर्यावरणाचे रक्षण करणे.
९) समाजातील गरजू घटकांना अन्नदान करणे व त्यासाठी विशिष्ठ निधी वगैरे जमवणे आणि त्याच्या (निधीच्या) व्याजातून किंवा प्रत्यक्ष निधीतून अन्नदानाचा खर्च चालविणे.
१०) वरील सर्व उदिष्टांच्या पूर्तीसाठी आवश्यक व जरूरीची सर्व कामे हाती घेणे, कार्यान्वित करणे व पार पाडणे. महाराष्ट्रात, भारतात व सर्वत्र अशा क्रमाने ठिकठिकाणी संस्थेची केंद्रे आणि तपोवन प्रकल्प, साधना केंद्रे आदि सुरू करून तेथून वरील उद्दिष्टांची पूर्ती करणे.
9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!